स्वर आले दुरुनी


___________


स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्याचे
आकाश फिकटल्या तार्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितागुजाही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्धयानी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
खाली फुंकर हललेच कुणी

पडसाद कसा आला न काळे
अवसेत कधी  का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी ?
_________________

गीत : यशवंत देव
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : सुधीर फडके